सोमवार, २८ नोव्हेंबर, २०१६

कविता : अवखळ

अवखळ मन वाऱ्यासवे निघाले
दूर पल्याड रानावरी आले
पाहूनी हिरवी झाड-पाले
मन झाले पावसाने चिंब ओले ।। १ ।।

मन धावत पुढे आले
गोदा-भीमे तिरी विसावले
पाहूनी साधू संतांचे मेळावे
मन झाले पावसाने चिंब ओले ।। २ ।।

मन घोड-दौडतच राहिले
गड-किल्यांवरी पोहोचले
राजे मावळ्यांच्या आठवाने
मन झाले पावसाने चिंब ओले ।। ३ ।।

मन सैरभैर झाले
अनंत आकाशी उडाले
सांजेला घराच्या ओढीने
मन झाले पावसाने चिंब ओले ।। ४ ।। 


- जयराज 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा