================================================
१. वृथा वृष्टिः समुद्रेषु ।
वृथा तृप्तस्य भोजनम् ।
वृथा दानं समर्थस्य ।
वृथा दीपो दिवाऽपि च ।।
अर्थ: समुद्रात पाऊस, पोट भरल्या व्यक्तीस जेवण देणे, श्रीमंत व्यक्तीस दान देणे आणि दिवसा दिवा लावणे व्यर्थ आहे.
================================================
२. आकाशात पतितं तोयं, यथा गच्छति सागरम् ।
सर्व देव नमस्कार:, केशवं प्रति गच्छति ।।
अर्थ: आकाशातून पडलेले पाणी जसे सागरास मिळते. तसे, सर्व देवांना केलेला नमस्कार केशवाला सुद्धा पोहोचतो.
===============================================
३. अंजलिस्थानी पुष्पाणि, वासयन्ति करद्वयम् ।
अहो सुमनसाम् प्रीती, वामदक्षिणायॊ: समा ।।
अर्थ: ओंजळीत घेतलेली फुले दोन्ही हातांना सुगंधित करतात. खरेच फुलांची प्रीत काय वर्णन करावी, डावे-उजवे दोहोंसाठी समान...!!!
याचा भावार्थ असा कि, फुलांसारखे कोमल व स्वच्छ मन असणाऱ्या व्यक्ती कधीही आपलं-परकं, चांगलं-वाईट असा भेद न करता सर्वांना सारखे महत्व आणि प्रेम देतात.
================================================
४. अश्वम् नैव गजम् नैव, व्याघ्रम् नैव च नैव च ।
अजापुत्र बलिं दद्यात, देवो दुर्बल घातक: ।।
अर्थ: घोडा नाही, हत्ती नाही आणि वाघ तर मुळीच नाही. बोकडाच्या पुत्राचा बाली दिला जातो. देव सुध्दा दुर्बलांचाच घात करतो.
अर्थात, जो सामर्थ्यवान आहे त्याचीच देव सुध्दा मदत करतो, अशा अर्थाचा हे सुभाषित. दैवाची/देवाची मदत मिळविण्याआधी स्वत: स्वतःची मदत करणे आवश्यक असते. "प्रयत्नांती परमेश्वर" असा याचा भावार्थ आहे.
===============================================
५. कुजतं राम रामेती ,मधुरं मधुराक्षरं ।
आरूह्य कविता शाखां, वंदे वाल्मिकी कोकिलं ।।
अर्थ: कवितेच्या शाखेवर आरूढ होऊन, राम-राम अशा मधुर अक्षरांचा मधुरपणे कुंजन (जप) करणाऱ्या कोकीळरूपी वाल्मिकी ऋषींना नमस्कार असो.
वाल्मिकी ऋषींनी रामायण पद्य (कविता/सुभाषित/श्लोक) स्वरूपात लिहिले असल्याने रामायणाचा "कविता शाखा" तर वाल्मिकींचा कोकीळ असा सुंदर उल्लेख बुध कौशिक ऋषी करतात.
===============================================
६. राम रामेती रामेती, रमे रामे मनोरमे ।
सहस्त्रनाम ततुल्यं, रामनाम वरानने ।।
अर्थ: राम राम असा जप करत त्यामध्ये मन रमविणे हे विष्णुंच्या सहस्त्र नाम जपण्यासारखे आहे.
===============================================
७. भर्जनम् भव बीजानां, अर्जनं सुख संपदाम् ।
तर्जनं यमदूतानां, रामरामेती गर्जनम् ।।
अर्थ: भव-सागरातील (संसारामधील/जगामधील) सर्व दुःखांचा समूळ नाश करण्यासाठी, सुख-संपदा (भौतिकापेक्षा आत्मिक अर्थाने घ्यावी) मिळविण्यासाठी, यमदूतांना घाबरवण्यासाठी (मरणाची भीती घालवण्यासाठी), राम राम असे म्हणावे.
कदाचित याच कारणासाठी अंत्ययात्रेत रामनामाचा जप करत असावेत.
===============================================
८. दक्षिणे लक्ष्मणो यस्य, वामे तु जनकात्मजा ।
पुरतो मारुतिर्यस्य, तम् वन्दे रघुनंदनं ।।
अर्थ: ज्याच्या उजव्या (दक्षिण) बाजूस लक्ष्मण आणि डाव्या (वाम) बाजूस जनकपुत्री (माता सीता) आहे. ज्याच्या समोर (पुरत:) मारुती आहे अशा रघुनंदनाला (प्रभू श्रीरामांना) नमस्कार असो...!!!
===============================================
९. श्रीरामचंद्रचरणौ मनसा स्मरामि ।
श्रीरामचंद्रचरणौ वचसा गृणामि ।
श्रीरामचंद्रचरणौ शिरसा नमामि ।
श्रीरामचंद्रचरणौ शरणं प्रपद्ये ।।
अर्थ: श्रीरामचन्द्राच्या चरणांचे मी मनात स्मरण करतो, श्रीरामचन्द्राच्या चरणांचे मी वाणीने कौतुक करतो, श्रीरामचन्द्राच्या चरणांवर मी माथा टेकवून नमन करतो, (आणि) श्रीरामचन्द्राच्या चरणांपाशीच मी शरण जातो.
===============================================
१०. रामो राजमणि: सदा विजयते, रामं रमेशं भजे ।
रामेणाभिहता निशाचरचमू:, रामाय तस्मै नमः ।।
रामान्नास्ती परायणं परतरं, रामस्य दासोSस्म्यहं ।
रामे चित्तलय: सदा भवतु मे, भो: राम माम उद्धरम् ।।
अर्थ: राजांमध्ये श्रेष्ठ (राजमणी) अशा श्रीरामांचा नित्य विजय होतो. सीतापती (रमेश=रमा+ईश, रमेचा देव, रामाची पत्नी म्हणून रमा) रामाचे भजन करा. श्रीरामांकडून राक्षसांचा (निशाचर चमू = रात्री टोळीने भटकणारे उर्फ राक्षस) नाश झाला, त्यामुळे/अशा श्रीरामांना नमस्कार,वंदन असो...!!!
श्रीरामांपेक्षा मोठा असा कोणताही आश्रय नाही. मी श्रीरामांचा दास आहे. माझे मन रामातच (रामनामातच) लीन असावे. हे प्रभू श्रीराम, माझा उद्धार करावा...!!!
==============================================
सुभाषित क्र. ५ ते १० रामरक्षा स्तोत्रातील श्लोक आहेत.
===============================================
११. दुःखेश्वनुद्विग्नमना:, सुखेषु विगतस्पृहः ।
वीतरागभयक्रोध:, स्थितधीर्मुनिरुच्यते ।।
अर्थ: दुःखामुळे जो उद्विग्न होत नाही अन् केवळ सुखाच्या मागे लागत नाही (किंवा सुखाने हुरळूनही जात नाही). जो ओढ, भय, क्रोध रहित आहे, असा स्थिर बुद्धीचा (स्थित-धी) मुनी, साधू जाणावा.
===============================================
१२. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम् देव देव ।।
अर्थ: तुम्हीच माझी आई आहात, तुम्हीच माझे पिता आहात. तुम्हीच माझे बंधू आणि तुम्हीच माझे मित्रही आहात. तुम्हीच माझी विद्या/ज्ञान आहेत, तुम्हीच माझे वित्त आहात. हे देवाधिदेवा, तुम्हीच माझे सर्वस्व आहात.
१. वृथा वृष्टिः समुद्रेषु ।
वृथा तृप्तस्य भोजनम् ।
वृथा दानं समर्थस्य ।
वृथा दीपो दिवाऽपि च ।।
अर्थ: समुद्रात पाऊस, पोट भरल्या व्यक्तीस जेवण देणे, श्रीमंत व्यक्तीस दान देणे आणि दिवसा दिवा लावणे व्यर्थ आहे.
================================================
२. आकाशात पतितं तोयं, यथा गच्छति सागरम् ।
सर्व देव नमस्कार:, केशवं प्रति गच्छति ।।
अर्थ: आकाशातून पडलेले पाणी जसे सागरास मिळते. तसे, सर्व देवांना केलेला नमस्कार केशवाला सुद्धा पोहोचतो.
===============================================
३. अंजलिस्थानी पुष्पाणि, वासयन्ति करद्वयम् ।
अहो सुमनसाम् प्रीती, वामदक्षिणायॊ: समा ।।
अर्थ: ओंजळीत घेतलेली फुले दोन्ही हातांना सुगंधित करतात. खरेच फुलांची प्रीत काय वर्णन करावी, डावे-उजवे दोहोंसाठी समान...!!!
याचा भावार्थ असा कि, फुलांसारखे कोमल व स्वच्छ मन असणाऱ्या व्यक्ती कधीही आपलं-परकं, चांगलं-वाईट असा भेद न करता सर्वांना सारखे महत्व आणि प्रेम देतात.
================================================
४. अश्वम् नैव गजम् नैव, व्याघ्रम् नैव च नैव च ।
अजापुत्र बलिं दद्यात, देवो दुर्बल घातक: ।।
अर्थ: घोडा नाही, हत्ती नाही आणि वाघ तर मुळीच नाही. बोकडाच्या पुत्राचा बाली दिला जातो. देव सुध्दा दुर्बलांचाच घात करतो.
अर्थात, जो सामर्थ्यवान आहे त्याचीच देव सुध्दा मदत करतो, अशा अर्थाचा हे सुभाषित. दैवाची/देवाची मदत मिळविण्याआधी स्वत: स्वतःची मदत करणे आवश्यक असते. "प्रयत्नांती परमेश्वर" असा याचा भावार्थ आहे.
===============================================
५. कुजतं राम रामेती ,मधुरं मधुराक्षरं ।
आरूह्य कविता शाखां, वंदे वाल्मिकी कोकिलं ।।
अर्थ: कवितेच्या शाखेवर आरूढ होऊन, राम-राम अशा मधुर अक्षरांचा मधुरपणे कुंजन (जप) करणाऱ्या कोकीळरूपी वाल्मिकी ऋषींना नमस्कार असो.
वाल्मिकी ऋषींनी रामायण पद्य (कविता/सुभाषित/श्लोक) स्वरूपात लिहिले असल्याने रामायणाचा "कविता शाखा" तर वाल्मिकींचा कोकीळ असा सुंदर उल्लेख बुध कौशिक ऋषी करतात.
===============================================
६. राम रामेती रामेती, रमे रामे मनोरमे ।
सहस्त्रनाम ततुल्यं, रामनाम वरानने ।।
अर्थ: राम राम असा जप करत त्यामध्ये मन रमविणे हे विष्णुंच्या सहस्त्र नाम जपण्यासारखे आहे.
===============================================
७. भर्जनम् भव बीजानां, अर्जनं सुख संपदाम् ।
तर्जनं यमदूतानां, रामरामेती गर्जनम् ।।
अर्थ: भव-सागरातील (संसारामधील/जगामधील) सर्व दुःखांचा समूळ नाश करण्यासाठी, सुख-संपदा (भौतिकापेक्षा आत्मिक अर्थाने घ्यावी) मिळविण्यासाठी, यमदूतांना घाबरवण्यासाठी (मरणाची भीती घालवण्यासाठी), राम राम असे म्हणावे.
कदाचित याच कारणासाठी अंत्ययात्रेत रामनामाचा जप करत असावेत.
===============================================
८. दक्षिणे लक्ष्मणो यस्य, वामे तु जनकात्मजा ।
पुरतो मारुतिर्यस्य, तम् वन्दे रघुनंदनं ।।
अर्थ: ज्याच्या उजव्या (दक्षिण) बाजूस लक्ष्मण आणि डाव्या (वाम) बाजूस जनकपुत्री (माता सीता) आहे. ज्याच्या समोर (पुरत:) मारुती आहे अशा रघुनंदनाला (प्रभू श्रीरामांना) नमस्कार असो...!!!
===============================================
९. श्रीरामचंद्रचरणौ मनसा स्मरामि ।
श्रीरामचंद्रचरणौ वचसा गृणामि ।
श्रीरामचंद्रचरणौ शिरसा नमामि ।
श्रीरामचंद्रचरणौ शरणं प्रपद्ये ।।
अर्थ: श्रीरामचन्द्राच्या चरणांचे मी मनात स्मरण करतो, श्रीरामचन्द्राच्या चरणांचे मी वाणीने कौतुक करतो, श्रीरामचन्द्राच्या चरणांवर मी माथा टेकवून नमन करतो, (आणि) श्रीरामचन्द्राच्या चरणांपाशीच मी शरण जातो.
===============================================
१०. रामो राजमणि: सदा विजयते, रामं रमेशं भजे ।
रामेणाभिहता निशाचरचमू:, रामाय तस्मै नमः ।।
रामान्नास्ती परायणं परतरं, रामस्य दासोSस्म्यहं ।
रामे चित्तलय: सदा भवतु मे, भो: राम माम उद्धरम् ।।
अर्थ: राजांमध्ये श्रेष्ठ (राजमणी) अशा श्रीरामांचा नित्य विजय होतो. सीतापती (रमेश=रमा+ईश, रमेचा देव, रामाची पत्नी म्हणून रमा) रामाचे भजन करा. श्रीरामांकडून राक्षसांचा (निशाचर चमू = रात्री टोळीने भटकणारे उर्फ राक्षस) नाश झाला, त्यामुळे/अशा श्रीरामांना नमस्कार,वंदन असो...!!!
श्रीरामांपेक्षा मोठा असा कोणताही आश्रय नाही. मी श्रीरामांचा दास आहे. माझे मन रामातच (रामनामातच) लीन असावे. हे प्रभू श्रीराम, माझा उद्धार करावा...!!!
==============================================
सुभाषित क्र. ५ ते १० रामरक्षा स्तोत्रातील श्लोक आहेत.
===============================================
११. दुःखेश्वनुद्विग्नमना:, सुखेषु विगतस्पृहः ।
वीतरागभयक्रोध:, स्थितधीर्मुनिरुच्यते ।।
अर्थ: दुःखामुळे जो उद्विग्न होत नाही अन् केवळ सुखाच्या मागे लागत नाही (किंवा सुखाने हुरळूनही जात नाही). जो ओढ, भय, क्रोध रहित आहे, असा स्थिर बुद्धीचा (स्थित-धी) मुनी, साधू जाणावा.
===============================================
१२. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम् देव देव ।।
अर्थ: तुम्हीच माझी आई आहात, तुम्हीच माझे पिता आहात. तुम्हीच माझे बंधू आणि तुम्हीच माझे मित्रही आहात. तुम्हीच माझी विद्या/ज्ञान आहेत, तुम्हीच माझे वित्त आहात. हे देवाधिदेवा, तुम्हीच माझे सर्वस्व आहात.
"तू माझा सांगाती" असे आपल्या आराध्याबाबत सांगणारा श्लोक.
===============================================
१३. यस्य नास्ति स्वयं प्रज्ञा, शास्त्रं तस्य करोति किम्? ।
लोचनाभ्यां विहीनस्य, दर्पणः किं करिष्यति ।।
अर्थ: ज्याला स्वत:ची बुद्धीच नाही, त्याला शास्त्र काय ज्ञान देणार? जसे अंध व्यक्तीस आरसा तरी काय दाखवणार?
===============================================
१४. विद्या ददाति विनयं, विनयाद्याति पात्रताम् ।
पात्रत्वाद्धनमाप्नोति, धनाद्धर्मं ततस्सुखम् ।।
अर्थ: विद्येने नम्रता येते, नम्रतेमुळे पात्रता येते. अशा पात्रतेमुळे धन मिळते. (आणि) त्या धनाने धर्मकार्य (सत्कार्य) केल्याने सुख मिळते.
===============================================
१५. मर्कटस्य सुरापानं, मध्ये वृश्चिक दम्शनम् ।
तन्मध्ये भूतसञ्चारो, यद्वा तद्वा भविष्यति ।।
अर्थ: दारू पिलेल्या माकडाला विंचवाने दंश केला आणि त्यातून त्याच्यात भुताने संचार केला, तर काहीही होऊ शकते.
===============================================
१६. पठन्ति चतुरो वेदान्, धर्मशास्त्राण्यनेकशः ।
आत्मानं नैव जानन्ति, दर्वी पाकरसं यथा ।।
अर्थ: काही विद्वान, चार वेद, धर्मशास्त्र आदींचे पठण करतात. पण आमटीत असलेला चमचा जसा त्याची चव जणू शकत नाही, तसे हे आत्म्यास जाणत नाहीत.
केवळ पोपटपंची करून पंडित म्हणवून घेणारे, विद्वान असतीलच असे नाही. जो आत्म्यास, अंतरंगास समजू शकतो तो विद्वान.
"तुज आहे तुजपाशी परी जागा चुकलासी अशा अर्थाचा हा श्लोक.
===============================================
१७. शतेषु जायते शूरः, सहस्रेषु च पण्डितः ।
वक्ता दशसहस्रेषु, दाता भवति वा न वा ।।
अर्थ: शंभर लोकांत एक शूर मिळू शकेल, हजारांत एखादा पंडित भेटेल, दहा हजारांत एक उत्तम वक्ता असू शकेल पण दानी मनुष्य फार क्वचित सापडेल.
===============================================
१८. तुष्यन्ति भोजने विप्रा, मयूरा घनगर्जिते ।
साधवो परसम्पत्तौ, खलः परविपत्तिषु ।।
अर्थ: ब्राह्मण जेवणाने, मोर मेघ गर्जनेने, साधू दुसरयांच्या संपत्तीने (म्हणजे दुसऱ्याच्या भरभराटाने) तर दुर्जन दुसऱ्याला दुःखात किंवा संकटात पाहून खुश होतात.
================================================
१३. यस्य नास्ति स्वयं प्रज्ञा, शास्त्रं तस्य करोति किम्? ।
लोचनाभ्यां विहीनस्य, दर्पणः किं करिष्यति ।।
अर्थ: ज्याला स्वत:ची बुद्धीच नाही, त्याला शास्त्र काय ज्ञान देणार? जसे अंध व्यक्तीस आरसा तरी काय दाखवणार?
===============================================
१४. विद्या ददाति विनयं, विनयाद्याति पात्रताम् ।
पात्रत्वाद्धनमाप्नोति, धनाद्धर्मं ततस्सुखम् ।।
अर्थ: विद्येने नम्रता येते, नम्रतेमुळे पात्रता येते. अशा पात्रतेमुळे धन मिळते. (आणि) त्या धनाने धर्मकार्य (सत्कार्य) केल्याने सुख मिळते.
===============================================
१५. मर्कटस्य सुरापानं, मध्ये वृश्चिक दम्शनम् ।
तन्मध्ये भूतसञ्चारो, यद्वा तद्वा भविष्यति ।।
अर्थ: दारू पिलेल्या माकडाला विंचवाने दंश केला आणि त्यातून त्याच्यात भुताने संचार केला, तर काहीही होऊ शकते.
===============================================
१६. पठन्ति चतुरो वेदान्, धर्मशास्त्राण्यनेकशः ।
आत्मानं नैव जानन्ति, दर्वी पाकरसं यथा ।।
अर्थ: काही विद्वान, चार वेद, धर्मशास्त्र आदींचे पठण करतात. पण आमटीत असलेला चमचा जसा त्याची चव जणू शकत नाही, तसे हे आत्म्यास जाणत नाहीत.
केवळ पोपटपंची करून पंडित म्हणवून घेणारे, विद्वान असतीलच असे नाही. जो आत्म्यास, अंतरंगास समजू शकतो तो विद्वान.
"तुज आहे तुजपाशी परी जागा चुकलासी अशा अर्थाचा हा श्लोक.
===============================================
१७. शतेषु जायते शूरः, सहस्रेषु च पण्डितः ।
वक्ता दशसहस्रेषु, दाता भवति वा न वा ।।
अर्थ: शंभर लोकांत एक शूर मिळू शकेल, हजारांत एखादा पंडित भेटेल, दहा हजारांत एक उत्तम वक्ता असू शकेल पण दानी मनुष्य फार क्वचित सापडेल.
===============================================
१८. तुष्यन्ति भोजने विप्रा, मयूरा घनगर्जिते ।
साधवो परसम्पत्तौ, खलः परविपत्तिषु ।।
अर्थ: ब्राह्मण जेवणाने, मोर मेघ गर्जनेने, साधू दुसरयांच्या संपत्तीने (म्हणजे दुसऱ्याच्या भरभराटाने) तर दुर्जन दुसऱ्याला दुःखात किंवा संकटात पाहून खुश होतात.
================================================
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा