स्थितःप्रज्ञ किंवा स्थितप्रज्ञ कोणाला म्हणावे? स्थितप्रज्ञ व्यक्ती म्हणजे नेमकं काय असा प्रश्न मला नेहमी पडतो. स्थितप्रज्ञ व्यक्तीबद्दल मला नेहमीच आकर्षण कम कुतूहल वाटत आलं आहे. पण अशी व्यक्ती नजरेत मात्र आली नाही. मनुष्याला अज्ञाताचे जास्तच आकर्षण किंवा कुतूहल असते या न्यायाने दिवसें-दिवस माझे हे कुतूहल वाढतच जात आहे.
आता स्थितप्रज्ञ म्हणजे नक्की काय यावर मी विचार करायला सुरुवात केली ती म्हणजे शब्दाच्या अर्थापासून. "या शब्दात काही दडलंय का?" हे पाहायला. Reading Between the Lines सारखं Meaning from the Word (शब्दांचा स्वतःचा अर्थ) शोधायला सुरुवात केली.
मुळात स्थितप्रज्ञ हा संस्कृत शब्द (विशेषण) आहे हे मला त्याची फोड केल्यावर (संधी सोडवल्याने) कळाले. "स्थित:" म्हणजे "स्थिर" आणि "प्रज्ञ/प्रज्ञा" म्हणजे "बुद्धी". थोडक्यात, "स्थितप्रज्ञ" म्हणजे "स्थिर बुद्धी"...!!! जर ती स्त्री असेल तर "स्थितप्रज्ञा" असे म्हटले जाते. नामानुसार विशेषण या न्यायाने संस्कृतात पुरुषास "स्थितप्रज्ञ:" आणि स्त्रीस "स्थितप्रज्ञा" असे संबोधले जाते. च. भू. दे. घे.
आता अशी फोड केली कि कोणाही सामान्य मनुष्याप्रमाणे मी हि लगेच, "जो अबोल आहे, शांत आहे तो स्थितप्रज्ञ" या निष्कर्षाप्रत पोहोचलो. पण लगेच माझ्या "शंकेखोर" मनाने दुसरा प्रश्न केला, "मग असे असेल तर एकलकोंडा आणि स्थितप्रज्ञ यात फरक काय?" संस्कृत मध्ये एकांतवासास "विजनवास" (जनविरहित वास तथा राहणे) असेही म्हटले आहे.
मग लगेच मनाने दुसरी व्याख्या दिली, "कोणत्याही प्रसंगात स्थिर मनाने, शांत वृत्तीने वागणारा..." पुन्हा प्रश्न, "धीरोदात्त म्हणजे काय मग?"
खरं पाहता, स्थितप्रज्ञ या शब्दातच त्याचे उत्तर दडले आहे. जसे मी आधी सांगितले प्रज्ञा म्हणजे बुद्धी. स्थितप्रज्ञ मध्ये बुद्धीचा समावेश आहे. याचाच अर्थ स्थितप्रज्ञ व्यक्तीला बुद्धी असली पाहिजे. कारण अबोल, शांत तर कोणीही व्यक्ती असू शकते. आता शांत राहायचे कि नाही, एवढं जरी ज्याला कळतं त्यालाही बुद्धी आहे म्हणावी लागेल. नाहीतर काही असतातच, तोंड बंद तोवर संत आणि तोंड उघडताच... असो...
तर स्थितप्रज्ञ या शब्दाचा मला लागलेला अर्थ असा कि, "कोणत्याही परिस्थितीत स्थिर बुद्धीने, कसलाही पक्षपात न करता, घडणाऱ्या अथवा घडलेल्या घटनांचा वा कृतींचा सर्व बाजूने ,समतोल विचार करणे आणि मग प्रत्यक्ष कृती करणे" आणि जी व्यक्ती हे करू शकते अशी व्यक्तीच स्थितप्रज्ञ म्हणविली जाते.
त्यामुळे ज्याला स्वतःचे असे मत, विचारच नाही, आणि जो ते वेळप्रसंगी व्यक्त करू शकत नाही त्याचे अबोल, शांत असणे स्थितप्रज्ञ म्हणण्याच्या योग्यतेचे आहे असे मला वाटत नाही.
इतिहासात स्थितप्रज्ञ हि उपाधी फार कमी लोकांना मिळाली आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर प्रभू श्रीरामांचे देता येईल. वयोवृद्ध पित्याच्या आज्ञेवरून शांतपणे स्वतःच्या राज्याभिषेकाची तयारी करणारे प्रभू श्रीराम आणि त्याच दिवशी पित्याचे वचन न मोडले जावे म्हणून वनवास स्वीकारणारे श्रीराम...!!! ना विजयाचा उन्माद ना सर्वपरित्यागाचे दुःख...!!! वनवासात असतानाही सीतामाईच्या सुटकेसाठी वानरसेनेची मदत घेऊन लंकेसारख्या अन् रावणासारख्या बलाढ्य शत्रूशी लढण्याचे साहस "स्थितप्रज्ञ" व्यक्तीच करू शकते. इथे प्रभू श्रीरामांना देव स्वरूपात न पाहता मनुष्य स्वरूपात पहा, म्हणजे या घटनांची व्याप्ती आणि त्यांनी केलेला सामना याची सांगड घालता येईल. कारण एकदा का एखाद्या व्यक्तीस देवपण दिले कि त्याने केलेली कसलीही कृती "चमत्कारा"च्या श्रेणीत जाते आणि आपण मग तो प्रयत्न करण्याच्या शक्यतेतून आपली सहज सुटका करून घेतो.
आजच्या काळात आपल्याला प्रभू श्रीरामांप्रमाणे अचाट साहस करायचे नसले तरी केवळ स्थितप्रज्ञ होण्याचा प्रयत्न करायचा असेल तर एखादी कृती आपल्याकडून वा दुसऱयांकडून झाली तर इतकंच करायचं, "आपण जर त्याच्या जागी असतो तर काय केलं असतं?" किंवा एखादी कृती कितपत चूक वा बरोबर हे ठरविण्यापेक्षा "काय केल्याने समोरच्यास व्यवस्थित परिस्थितीचे आकलन होईल?" याचा विचार एकदा तरी अवश्य करायचा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आधी त्या व्यक्तीची पूर्ण गोष्ट ऐकून घ्यायची किंवा घडत असलेल्या घटनांची, हार न मानता, पूर्णपणे शहनिशा करायची. हे सारं तेव्हाच शक्य होईल जेव्हा आपलं मन, बुद्धी स्थिर असेल, आपणांस मनुष्याची, त्याच्या भावनांची जाणीव असेल, आपल्यात अहंभावाची कमी असेल आणि मीही चुकू शकतो/ते ही जाणीव असेल. तसेच जर कोणी याच भावनेने आपल्या पुढे नमत घेत असेल, तर तो आपल्या अहंभावाचा विजय न मानता त्या नम्रतेचे तितक्याच नम्रतेने स्वागत करून आपल्याही मनाचा मोठेपणा दाखवून द्यायचा. अर्थात, हे सगळ्यांना जमेलच असे नाही, कारण मनाचा मोठेपणा उसना आणता येत नाही, तो जर असेल तर दिसून येतोच.
कठीण प्रसंगात नेहमी आपण आपल्याला अनुकूल असाच निर्णय घेतो. हा दोष नसून मनुष्य स्वभाव-गुण आहे. कारण अशा प्रसंगात मनुष्य मन इतके सैरभैर होऊन जाते कि, त्याला निर्णय घेणे कठीण असते आणि त्यातून इतरांच्या अनुभवाचे गाठोडे आपली "बुडत्याचा पाय खोलात" अशी अवस्था करते. अन् अशा वेळी मन, बुद्धी स्थिर ठेवण्याचे काम खूप कठीण असते.
भगवद-गीतेत स्थितप्रज्ञ मुनींचे लक्षण सांगणारा फार सुंदर श्लोक आहे,
दुःखेश्वनुद्विग्नमना:, सुखेषु विगतस्पृहः ।
वीतरागभयक्रोध:, स्थितधीर्मुनिरुच्यते ।।
अर्थात, दुःखामुळे जो उद्विग्न होत नाही अन् केवळ सुखाच्या मागे लागत नाही (किंवा सुखाने हुरळूनही जात नाही). जो ओढ, भय, क्रोध रहित आहे, असा स्थिर बुद्धीचा (स्थित-धी) मुनी, साधू जाणावा.
स्थितप्रज्ञ होणे एक व्रत आहे. जमण्यास कठीण असे, पण जमल्यास अध्यात्मिक चैतन्य देणारे...!!! मनुष्यातील बुद्धीचा, विचार करण्याच्या शक्तीचा वापर करून अहंभाव लयास नेणारे आणि भौतिक (सत्ता, संपत्ती, खानदान) सौख्य नसून आंतरिक चैतन्य, आनंद देणारे...!!!
इथे क्रोध न येणे म्हणजे चुकीच्या, अन्यायाच्या ठिकाणी "मूग गिळून गप्प" राहणे असे नव्हे. पण आपली चूक असतानाही, माझंच खरं ठरविण्यासाठी, आपण जो कधी-कधी राग दाखवतो किंवा, छोट्या-छोट्या गोष्टीत, क्षणा-क्षणाला आपणास जो राग येतो तो ताब्यात ठेवणे. कारण राग येणे जर स्थितप्रज्ञ नसण्याचे लक्षण असते तर महादेव कधीच स्थितप्रज्ञ गणले गेले नसते. माझ्या मतानुसार तर सांब सदाशिव आणि माता पार्वती यांसारखे स्थितप्रज्ञ असण्याचे दुसरे श्रेष्ठ उदाहरण नाही. भक्तीने सर्वात लवकर प्रसन्न होणारे आणि भक्त रक्षण्यास, अन्यायाविरुद्ध क्रोधाची परिसीमा गाठणारे शंभू आणि विना अलंकार, निरंकार मनाने महादेवाची भावोत्कटपणे, विनातक्रार सेवा करणाऱ्या माता पार्वती...!!! संपत्तीमागे धावणाऱ्या, उच्च-नीच भेदभाव करणाऱ्या, अहंभाव जपणाऱ्या आणि अशा गोष्टींचा वृथा अभिमान बाळगणाऱ्या लोकांस स्थितप्रज्ञ होणे जमू शकेल?
शेवट करताना इतकंच म्हणेन कि, आपल्याला साधू, मुनीं सारखे जरी स्थितप्रज्ञ बनायचे नसले तरी, एक चांगला "माणूस" बनण्यासाठी, माणुसकीच्या नात्याने, आत्मिक समाधान, चैतन्याप्रती दुसर्याचा विचार करण्यास सुरुवात केली पाहिजे, असे मला वाटते.
मी काही "स्थितप्रज्ञ" नाही, त्यामुळे हे जे मी काही अधिकाराने विचार मांडले, लिहिलेत, ते केवळ मला ही दिशा मिळाली आहे आणि ती तुम्हा सर्वांसोबत "शेअर" करावीशी वाटली म्हणून...!!! त्यामुळे, माझे काही चुकलेले आढळल्यास, "माझा विचार करून", माफ करा आणि चूक सुधारण्यास मदत करा...!!!
हम है राही प्यार के, हम से कुछ ना बोलिये ।
जो भी प्यार से मिला, हम उसी के हो लिये ।।
दर्द भी हमे कबूल, चैन भी हमे कबूल ।
हमने हर तरह के फूल, हार में पिरो लिये ।।
आता स्थितप्रज्ञ म्हणजे नक्की काय यावर मी विचार करायला सुरुवात केली ती म्हणजे शब्दाच्या अर्थापासून. "या शब्दात काही दडलंय का?" हे पाहायला. Reading Between the Lines सारखं Meaning from the Word (शब्दांचा स्वतःचा अर्थ) शोधायला सुरुवात केली.
मुळात स्थितप्रज्ञ हा संस्कृत शब्द (विशेषण) आहे हे मला त्याची फोड केल्यावर (संधी सोडवल्याने) कळाले. "स्थित:" म्हणजे "स्थिर" आणि "प्रज्ञ/प्रज्ञा" म्हणजे "बुद्धी". थोडक्यात, "स्थितप्रज्ञ" म्हणजे "स्थिर बुद्धी"...!!! जर ती स्त्री असेल तर "स्थितप्रज्ञा" असे म्हटले जाते. नामानुसार विशेषण या न्यायाने संस्कृतात पुरुषास "स्थितप्रज्ञ:" आणि स्त्रीस "स्थितप्रज्ञा" असे संबोधले जाते. च. भू. दे. घे.
आता अशी फोड केली कि कोणाही सामान्य मनुष्याप्रमाणे मी हि लगेच, "जो अबोल आहे, शांत आहे तो स्थितप्रज्ञ" या निष्कर्षाप्रत पोहोचलो. पण लगेच माझ्या "शंकेखोर" मनाने दुसरा प्रश्न केला, "मग असे असेल तर एकलकोंडा आणि स्थितप्रज्ञ यात फरक काय?" संस्कृत मध्ये एकांतवासास "विजनवास" (जनविरहित वास तथा राहणे) असेही म्हटले आहे.
मग लगेच मनाने दुसरी व्याख्या दिली, "कोणत्याही प्रसंगात स्थिर मनाने, शांत वृत्तीने वागणारा..." पुन्हा प्रश्न, "धीरोदात्त म्हणजे काय मग?"
खरं पाहता, स्थितप्रज्ञ या शब्दातच त्याचे उत्तर दडले आहे. जसे मी आधी सांगितले प्रज्ञा म्हणजे बुद्धी. स्थितप्रज्ञ मध्ये बुद्धीचा समावेश आहे. याचाच अर्थ स्थितप्रज्ञ व्यक्तीला बुद्धी असली पाहिजे. कारण अबोल, शांत तर कोणीही व्यक्ती असू शकते. आता शांत राहायचे कि नाही, एवढं जरी ज्याला कळतं त्यालाही बुद्धी आहे म्हणावी लागेल. नाहीतर काही असतातच, तोंड बंद तोवर संत आणि तोंड उघडताच... असो...
तर स्थितप्रज्ञ या शब्दाचा मला लागलेला अर्थ असा कि, "कोणत्याही परिस्थितीत स्थिर बुद्धीने, कसलाही पक्षपात न करता, घडणाऱ्या अथवा घडलेल्या घटनांचा वा कृतींचा सर्व बाजूने ,समतोल विचार करणे आणि मग प्रत्यक्ष कृती करणे" आणि जी व्यक्ती हे करू शकते अशी व्यक्तीच स्थितप्रज्ञ म्हणविली जाते.
त्यामुळे ज्याला स्वतःचे असे मत, विचारच नाही, आणि जो ते वेळप्रसंगी व्यक्त करू शकत नाही त्याचे अबोल, शांत असणे स्थितप्रज्ञ म्हणण्याच्या योग्यतेचे आहे असे मला वाटत नाही.
इतिहासात स्थितप्रज्ञ हि उपाधी फार कमी लोकांना मिळाली आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर प्रभू श्रीरामांचे देता येईल. वयोवृद्ध पित्याच्या आज्ञेवरून शांतपणे स्वतःच्या राज्याभिषेकाची तयारी करणारे प्रभू श्रीराम आणि त्याच दिवशी पित्याचे वचन न मोडले जावे म्हणून वनवास स्वीकारणारे श्रीराम...!!! ना विजयाचा उन्माद ना सर्वपरित्यागाचे दुःख...!!! वनवासात असतानाही सीतामाईच्या सुटकेसाठी वानरसेनेची मदत घेऊन लंकेसारख्या अन् रावणासारख्या बलाढ्य शत्रूशी लढण्याचे साहस "स्थितप्रज्ञ" व्यक्तीच करू शकते. इथे प्रभू श्रीरामांना देव स्वरूपात न पाहता मनुष्य स्वरूपात पहा, म्हणजे या घटनांची व्याप्ती आणि त्यांनी केलेला सामना याची सांगड घालता येईल. कारण एकदा का एखाद्या व्यक्तीस देवपण दिले कि त्याने केलेली कसलीही कृती "चमत्कारा"च्या श्रेणीत जाते आणि आपण मग तो प्रयत्न करण्याच्या शक्यतेतून आपली सहज सुटका करून घेतो.
आजच्या काळात आपल्याला प्रभू श्रीरामांप्रमाणे अचाट साहस करायचे नसले तरी केवळ स्थितप्रज्ञ होण्याचा प्रयत्न करायचा असेल तर एखादी कृती आपल्याकडून वा दुसऱयांकडून झाली तर इतकंच करायचं, "आपण जर त्याच्या जागी असतो तर काय केलं असतं?" किंवा एखादी कृती कितपत चूक वा बरोबर हे ठरविण्यापेक्षा "काय केल्याने समोरच्यास व्यवस्थित परिस्थितीचे आकलन होईल?" याचा विचार एकदा तरी अवश्य करायचा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आधी त्या व्यक्तीची पूर्ण गोष्ट ऐकून घ्यायची किंवा घडत असलेल्या घटनांची, हार न मानता, पूर्णपणे शहनिशा करायची. हे सारं तेव्हाच शक्य होईल जेव्हा आपलं मन, बुद्धी स्थिर असेल, आपणांस मनुष्याची, त्याच्या भावनांची जाणीव असेल, आपल्यात अहंभावाची कमी असेल आणि मीही चुकू शकतो/ते ही जाणीव असेल. तसेच जर कोणी याच भावनेने आपल्या पुढे नमत घेत असेल, तर तो आपल्या अहंभावाचा विजय न मानता त्या नम्रतेचे तितक्याच नम्रतेने स्वागत करून आपल्याही मनाचा मोठेपणा दाखवून द्यायचा. अर्थात, हे सगळ्यांना जमेलच असे नाही, कारण मनाचा मोठेपणा उसना आणता येत नाही, तो जर असेल तर दिसून येतोच.
कठीण प्रसंगात नेहमी आपण आपल्याला अनुकूल असाच निर्णय घेतो. हा दोष नसून मनुष्य स्वभाव-गुण आहे. कारण अशा प्रसंगात मनुष्य मन इतके सैरभैर होऊन जाते कि, त्याला निर्णय घेणे कठीण असते आणि त्यातून इतरांच्या अनुभवाचे गाठोडे आपली "बुडत्याचा पाय खोलात" अशी अवस्था करते. अन् अशा वेळी मन, बुद्धी स्थिर ठेवण्याचे काम खूप कठीण असते.
भगवद-गीतेत स्थितप्रज्ञ मुनींचे लक्षण सांगणारा फार सुंदर श्लोक आहे,
दुःखेश्वनुद्विग्नमना:, सुखेषु विगतस्पृहः ।
वीतरागभयक्रोध:, स्थितधीर्मुनिरुच्यते ।।
अर्थात, दुःखामुळे जो उद्विग्न होत नाही अन् केवळ सुखाच्या मागे लागत नाही (किंवा सुखाने हुरळूनही जात नाही). जो ओढ, भय, क्रोध रहित आहे, असा स्थिर बुद्धीचा (स्थित-धी) मुनी, साधू जाणावा.
स्थितप्रज्ञ होणे एक व्रत आहे. जमण्यास कठीण असे, पण जमल्यास अध्यात्मिक चैतन्य देणारे...!!! मनुष्यातील बुद्धीचा, विचार करण्याच्या शक्तीचा वापर करून अहंभाव लयास नेणारे आणि भौतिक (सत्ता, संपत्ती, खानदान) सौख्य नसून आंतरिक चैतन्य, आनंद देणारे...!!!
इथे क्रोध न येणे म्हणजे चुकीच्या, अन्यायाच्या ठिकाणी "मूग गिळून गप्प" राहणे असे नव्हे. पण आपली चूक असतानाही, माझंच खरं ठरविण्यासाठी, आपण जो कधी-कधी राग दाखवतो किंवा, छोट्या-छोट्या गोष्टीत, क्षणा-क्षणाला आपणास जो राग येतो तो ताब्यात ठेवणे. कारण राग येणे जर स्थितप्रज्ञ नसण्याचे लक्षण असते तर महादेव कधीच स्थितप्रज्ञ गणले गेले नसते. माझ्या मतानुसार तर सांब सदाशिव आणि माता पार्वती यांसारखे स्थितप्रज्ञ असण्याचे दुसरे श्रेष्ठ उदाहरण नाही. भक्तीने सर्वात लवकर प्रसन्न होणारे आणि भक्त रक्षण्यास, अन्यायाविरुद्ध क्रोधाची परिसीमा गाठणारे शंभू आणि विना अलंकार, निरंकार मनाने महादेवाची भावोत्कटपणे, विनातक्रार सेवा करणाऱ्या माता पार्वती...!!! संपत्तीमागे धावणाऱ्या, उच्च-नीच भेदभाव करणाऱ्या, अहंभाव जपणाऱ्या आणि अशा गोष्टींचा वृथा अभिमान बाळगणाऱ्या लोकांस स्थितप्रज्ञ होणे जमू शकेल?
शेवट करताना इतकंच म्हणेन कि, आपल्याला साधू, मुनीं सारखे जरी स्थितप्रज्ञ बनायचे नसले तरी, एक चांगला "माणूस" बनण्यासाठी, माणुसकीच्या नात्याने, आत्मिक समाधान, चैतन्याप्रती दुसर्याचा विचार करण्यास सुरुवात केली पाहिजे, असे मला वाटते.
मी काही "स्थितप्रज्ञ" नाही, त्यामुळे हे जे मी काही अधिकाराने विचार मांडले, लिहिलेत, ते केवळ मला ही दिशा मिळाली आहे आणि ती तुम्हा सर्वांसोबत "शेअर" करावीशी वाटली म्हणून...!!! त्यामुळे, माझे काही चुकलेले आढळल्यास, "माझा विचार करून", माफ करा आणि चूक सुधारण्यास मदत करा...!!!
हम है राही प्यार के, हम से कुछ ना बोलिये ।
जो भी प्यार से मिला, हम उसी के हो लिये ।।
दर्द भी हमे कबूल, चैन भी हमे कबूल ।
हमने हर तरह के फूल, हार में पिरो लिये ।।