"जगात अशाही काही व्यक्ती आहेत, ज्यांना स्वतःचे पापकर्म वाईट वाटणार नाहीत, पण ते उघड करणाऱ्याचे विचार मात्र नक्कीच वाईट वाटतील...!!!"
आता इथे पापकर्म म्हणजे त्रासदायक, दुष्कर्म, चुकीच्या घटना अशा अर्थाने घ्यावे.
आता उदाहरणच द्यायचं झालं तर, समजा, एखाद्या ठिकाणी चोरी झाली आणि त्या चोरीच्या वस्तूंपैकी काही वस्तू एखाद्या व्यक्तीकडे सापडल्या किंवा त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या म्हणून त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले. भले त्याने त्या वस्तू स्वत: चोरल्या नसाव्यात, दाम देऊन खरेदी केलेल्या असाव्यात किंवा चोरीत मदत केली म्हणून चोराने त्यास दिल्या असाव्यात. पण शेवटी त्या चोरीच्याच वस्तू. त्यामुळे पहिली "शंका/संशय" त्यावरच येणार हे कोणाही "बुद्धी" असणाऱ्या व्यक्तीला वेगळे सांगायला नको. त्याने चोरी अथवा चोरीत मदत केली नाही हे त्याला योग्य पुराव्यांनिशी सिद्ध करावे लागेल.
मग त्या व्यक्तीच्या सुरुवातीच्या पुराव्यांवरून, हावभाव/कृतींवरून जर त्याचे चोरांशी काही संबंध आढळलेच आणि त्यावरून त्याला, "तुझे चोरांशी कसे काय संबंध?" किंवा "यापूर्वी कधी चोरीच्या वस्तू खरेदी केल्या होत्या का?" किंवा "यापूर्वी कधी चोरी अथवा चोरीत मदत केली का?" असे काही प्रश्न विचारले गेले तर, "असे प्रश्न मला विचारलेच कसे जाऊ शकतात?" असे म्हणणे असंबंध तर आहेच पण मूर्खपणा शाबीत करणारे पण ठरते. कारण असे प्रश्न विचारणारा कितीही जवळचा असला तरी, या गोष्टी "विश्वासा"च्या कसोटीपेक्षा "बुद्धीच्या/तर्कांच्या" कसोटीवर सिद्ध होणे अपेक्षित असते.
विश्वास तेव्हाच निर्माण होतो,जेव्हा विश्वास ठेवण्यालायक कृती केली जाते.
शपथा घेऊन खोटे बोलण्यापेक्षा, पुराव्यांनिशी सिद्ध करावे.
उदा. मी चोराशी फारसं बोलत नाही, असे शपथेवर सांगावे आणि त्यांच्या संभाषणाची टेप, कागदपत्रंच उघड व्हावी, असे काहीसे विसंगत.
त्यामुळे विश्वासाच्या नावाखाली अंध-विश्वासाची अपेक्षा करू नये.
मग अशा व्यक्ती, त्या उघड करणाऱ्यास, संशयी, "माझ्याच गळ्यात पडलेला", "असल्याचं तोंडही पाहायचं नाही", "लायकी" नसलेला, कमी/छोट्या "खानदानाचा" अशा "शेलक्या" शब्दांचा आहेर करतात. ते केवळ असलाच "आहेर" करू शकतात, कारण बाकी सारा "नगदी आहेर" त्यांनी केवळ घेतलेला असतो. घेण्याचे त्यांना माहीत असते. देण्याचे नव्हे.
काही "सदा सुखी" व्यक्ती तर, हे प्रश्न त्या घटनेशी दुरान्वयेही संबंध नसलेल्या व्यक्तीला जोडून, "त्याला असे प्रश्न तुम्ही विचारले असते का?" किंवा "त्याला असे प्रश्न कोणी विचारले तर चालतील का?" असेही तोंड वर करून विचारतात. "विचारणारा कोण आहे", "कशा संबंधात/संदर्भात, कारणावरून विचारतो आहे" याचा विचार न करता, भलताच अर्थ काढून आपली बौद्धिक पातळी दाखवून देतात. "पडलो तरी नाक वर" या न्यायाने, घडल्या घटनांची माफ़ी मागणे, पुन्हा अशी चूक न करण्याची किंवा खबरदारी घेण्याची शाश्वती देणे या गोष्टी तर दूरच पण उलट त्या प्रश्न विचारणाऱ्याचीच, नरकाश्रू ढाळत, बदनामी करणे आणि स्वत:ला निर्दोष दाखवत राहणे, असा उद्योग करतात.
आपली समाजातील पत, प्रतिष्ठा, वजन, वर्तन, चारित्र्य स्वच्छ आहे म्हणून आपले "कसेही वागणे" सहन केले जावे हा केवळ "पोकळ अट्टाहास" आहे. कदाचित, आपल्या अशा वागण्याने, समाजातील तीच पत, प्रतिष्ठा धुळीस मिळू शकते. नाव कमवायला वेळ लागतो, पण बदनाम व्हायला क्षणही पुरेसा असतो. समाजाला शहनिशा करायला वेळही नसतो आणि गरजही नसते. उलट, एखाद्याचे बदनाम होणे समाजाच्या दृष्टीने मनोरंजनाचा खेळ होतो. नको तिथे "बडेजाव" करणे कदाचित अशा वेळी घातकही ठरू शकते.
वरील उदाहरणातील चौकशीची बातमी जर समाजात आली तर समाज त्या व्यक्तीस थेट चोर समजून बदनामी करायलाही कमी करणार नाही याची जाण ठेवावी आणि म्हणूनच फुकाचा "माज" दाखविण्यापेक्षा संयमाने अशा गोष्टी हाताळल्या जाव्यात, असे मला वाटते.
विश्वासाच्या गमजा मारण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवावी, रामायण सांगत असतानाही, सीतामाईची रावणाच्या तावडीतून सुटका केल्यावर, "अग्निपरीक्षा" घेऊनच प्रभू श्रीरामांनी स्वीकार केला होता, असे सांगितले जाते. शहाण्यास जास्त सांगणे न लागे. ती अग्निपरीक्षाही कमी पडली म्हणून, प्रजेच्या शंका निरसनासाठी, नंतर सीतामाईंना वनवासास पाठवले ही पुढची गोष्ट.
आंधळ्या विश्वासापेक्षा बुद्धीने ठेवलेला विश्वास जास्त भक्कमही असतो आणि चिरंतन टिकतो, हे ध्यानात असू द्या.
पाप, दुष्कर्म करण्याला घाबरा...!!! त्यांच्या उघड होण्याला किंवा परिणामाला नव्हे...!!!
तळटीप : वरील लेख, विचार थोडेसे कटू भासत असले तरी, त्यातून मला कोणाचाही अपमान, उपमर्द करायचा नाही, ना कोणाच्याही भावना दुखवायच्या आहेत. तसेच जाणते वा अजाणतेपणी कोणासही बदनाम करण्याचाही हेतू नाही. हे केवळ माझे विचार असून, कोणत्याही व्यक्ती, प्रसंग यांच्याशी त्यांचा आढळेला संबंध केवळ योगा-योग असावा.
आता इथे पापकर्म म्हणजे त्रासदायक, दुष्कर्म, चुकीच्या घटना अशा अर्थाने घ्यावे.
आता उदाहरणच द्यायचं झालं तर, समजा, एखाद्या ठिकाणी चोरी झाली आणि त्या चोरीच्या वस्तूंपैकी काही वस्तू एखाद्या व्यक्तीकडे सापडल्या किंवा त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या म्हणून त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले. भले त्याने त्या वस्तू स्वत: चोरल्या नसाव्यात, दाम देऊन खरेदी केलेल्या असाव्यात किंवा चोरीत मदत केली म्हणून चोराने त्यास दिल्या असाव्यात. पण शेवटी त्या चोरीच्याच वस्तू. त्यामुळे पहिली "शंका/संशय" त्यावरच येणार हे कोणाही "बुद्धी" असणाऱ्या व्यक्तीला वेगळे सांगायला नको. त्याने चोरी अथवा चोरीत मदत केली नाही हे त्याला योग्य पुराव्यांनिशी सिद्ध करावे लागेल.
मग त्या व्यक्तीच्या सुरुवातीच्या पुराव्यांवरून, हावभाव/कृतींवरून जर त्याचे चोरांशी काही संबंध आढळलेच आणि त्यावरून त्याला, "तुझे चोरांशी कसे काय संबंध?" किंवा "यापूर्वी कधी चोरीच्या वस्तू खरेदी केल्या होत्या का?" किंवा "यापूर्वी कधी चोरी अथवा चोरीत मदत केली का?" असे काही प्रश्न विचारले गेले तर, "असे प्रश्न मला विचारलेच कसे जाऊ शकतात?" असे म्हणणे असंबंध तर आहेच पण मूर्खपणा शाबीत करणारे पण ठरते. कारण असे प्रश्न विचारणारा कितीही जवळचा असला तरी, या गोष्टी "विश्वासा"च्या कसोटीपेक्षा "बुद्धीच्या/तर्कांच्या" कसोटीवर सिद्ध होणे अपेक्षित असते.
विश्वास तेव्हाच निर्माण होतो,जेव्हा विश्वास ठेवण्यालायक कृती केली जाते.
शपथा घेऊन खोटे बोलण्यापेक्षा, पुराव्यांनिशी सिद्ध करावे.
उदा. मी चोराशी फारसं बोलत नाही, असे शपथेवर सांगावे आणि त्यांच्या संभाषणाची टेप, कागदपत्रंच उघड व्हावी, असे काहीसे विसंगत.
त्यामुळे विश्वासाच्या नावाखाली अंध-विश्वासाची अपेक्षा करू नये.
मग अशा व्यक्ती, त्या उघड करणाऱ्यास, संशयी, "माझ्याच गळ्यात पडलेला", "असल्याचं तोंडही पाहायचं नाही", "लायकी" नसलेला, कमी/छोट्या "खानदानाचा" अशा "शेलक्या" शब्दांचा आहेर करतात. ते केवळ असलाच "आहेर" करू शकतात, कारण बाकी सारा "नगदी आहेर" त्यांनी केवळ घेतलेला असतो. घेण्याचे त्यांना माहीत असते. देण्याचे नव्हे.
काही "सदा सुखी" व्यक्ती तर, हे प्रश्न त्या घटनेशी दुरान्वयेही संबंध नसलेल्या व्यक्तीला जोडून, "त्याला असे प्रश्न तुम्ही विचारले असते का?" किंवा "त्याला असे प्रश्न कोणी विचारले तर चालतील का?" असेही तोंड वर करून विचारतात. "विचारणारा कोण आहे", "कशा संबंधात/संदर्भात, कारणावरून विचारतो आहे" याचा विचार न करता, भलताच अर्थ काढून आपली बौद्धिक पातळी दाखवून देतात. "पडलो तरी नाक वर" या न्यायाने, घडल्या घटनांची माफ़ी मागणे, पुन्हा अशी चूक न करण्याची किंवा खबरदारी घेण्याची शाश्वती देणे या गोष्टी तर दूरच पण उलट त्या प्रश्न विचारणाऱ्याचीच, नरकाश्रू ढाळत, बदनामी करणे आणि स्वत:ला निर्दोष दाखवत राहणे, असा उद्योग करतात.
आपली समाजातील पत, प्रतिष्ठा, वजन, वर्तन, चारित्र्य स्वच्छ आहे म्हणून आपले "कसेही वागणे" सहन केले जावे हा केवळ "पोकळ अट्टाहास" आहे. कदाचित, आपल्या अशा वागण्याने, समाजातील तीच पत, प्रतिष्ठा धुळीस मिळू शकते. नाव कमवायला वेळ लागतो, पण बदनाम व्हायला क्षणही पुरेसा असतो. समाजाला शहनिशा करायला वेळही नसतो आणि गरजही नसते. उलट, एखाद्याचे बदनाम होणे समाजाच्या दृष्टीने मनोरंजनाचा खेळ होतो. नको तिथे "बडेजाव" करणे कदाचित अशा वेळी घातकही ठरू शकते.
वरील उदाहरणातील चौकशीची बातमी जर समाजात आली तर समाज त्या व्यक्तीस थेट चोर समजून बदनामी करायलाही कमी करणार नाही याची जाण ठेवावी आणि म्हणूनच फुकाचा "माज" दाखविण्यापेक्षा संयमाने अशा गोष्टी हाताळल्या जाव्यात, असे मला वाटते.
विश्वासाच्या गमजा मारण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवावी, रामायण सांगत असतानाही, सीतामाईची रावणाच्या तावडीतून सुटका केल्यावर, "अग्निपरीक्षा" घेऊनच प्रभू श्रीरामांनी स्वीकार केला होता, असे सांगितले जाते. शहाण्यास जास्त सांगणे न लागे. ती अग्निपरीक्षाही कमी पडली म्हणून, प्रजेच्या शंका निरसनासाठी, नंतर सीतामाईंना वनवासास पाठवले ही पुढची गोष्ट.
आंधळ्या विश्वासापेक्षा बुद्धीने ठेवलेला विश्वास जास्त भक्कमही असतो आणि चिरंतन टिकतो, हे ध्यानात असू द्या.
पाप, दुष्कर्म करण्याला घाबरा...!!! त्यांच्या उघड होण्याला किंवा परिणामाला नव्हे...!!!
तळटीप : वरील लेख, विचार थोडेसे कटू भासत असले तरी, त्यातून मला कोणाचाही अपमान, उपमर्द करायचा नाही, ना कोणाच्याही भावना दुखवायच्या आहेत. तसेच जाणते वा अजाणतेपणी कोणासही बदनाम करण्याचाही हेतू नाही. हे केवळ माझे विचार असून, कोणत्याही व्यक्ती, प्रसंग यांच्याशी त्यांचा आढळेला संबंध केवळ योगा-योग असावा.