तू निघून गेलीस, अन् खरं सांगू?
दुसऱ्या कोणासही आता, पहावसंही वाटत नाही ।
अन् तू होतीस तेव्हा तरी, आठवतं का तुला?
दुसरी कोणी मला, दिसतंच नव्हती ।।
आहे माहित मजला, तू आता माझं, तोंडही पाहणार नाही ।
म्हणून मग मीच ठरवलं, तूला माझं, तोंडच दाखवायचं नाही ।।
नसतील दिसल्या माझ्या तुजला, खऱ्या भावना,
वाटले असतील बोलही माझे, तुजला कठोर ।
पण होत्या चुकाच तुझ्या, इतक्या गंभीर,
जाणिव तुजलाही व्हावी म्हणून, व्हावे लागले मला कठोर ।।
चूक नव्हती ती तुझी, होता तो विश्वासघात ।
अजूनही तूला न कळे हे, राहिलीस वेड्या भ्रमात ।।
कृतींचा तुज पश्चाताप नाही,
उघड झाल्या त्या, त्यांचं वाईट वाटलं? ।
मर्यादा, बंधन सोडून वागणं,
माझ्या काळजीचं तू, "संशयी" भांडवल केलं ।।
बळावत नसतो संशय, कृतींच्या खताशिवाय ।
मोकळ्या संवादाची औषधी फवारणी, त्यावर एकमात्र जालीम उपाय ।।
माझ्या आठवणी तुजसाठी, केवळ दुःस्वप्न अन् कठोर बोल ।
सोयिस्करपणे विसरलीस माझे, हळवे अन् प्रितीचे बोल ।।
वागली-बोललीस तू कशीही मजसवे ।
मजसाठी तुझ्या मात्र, केवळ सुख आसवे ।।
नसतात गं केवळ, मुलींचीच मनं हळवी ।
असतात काही मुलंही अशी, चुकीस कठोर, पण मनाने हळवी ।।
तूला दाखविता येतात अश्रू, मजसाठी तेही समाजमान्य नाही ।
हलके करायचो मन तुजपाशी, आता तर तोही आधार नाही ।।
आठव साऱ्या घडल्या घटना,
किती केलीस माझी कुचंबना ।
ठेवला तरी मी तुजवर विश्वास,
नाहीच पटले तुझ्या ते मनास ।।
चूकच तूला कळली नाही, मग माफिचा शब्द तरी कुठून येणार? ।
आधी डोळे झाकून दरीत ढकलणार, मगच माझा विश्वास मानणार? ।।
अपेक्षा केलीस तू मजकडून, सतत समजूतदारपणाची ।
आठव कितीदा केलीस कदर, तू माझ्या मनाची? ।।
माझ्या माफिचा अर्थ तूला, तुझ्या अहंकाराचा विजय वाटला ।
ईथेच झाली गफलत तुझी, नात्यांचा तूला भाव न कळला ।।
आता मी एकटा नाही ।
तुझ्या आठवणीं सोबत राही ।।
इतकंच कळलं तुझ्या जाण्याने ।
कोणासही न निवडले, मजसाठी विधात्याने ।।
तूला वाटेल कोणीही चांगला, आता मजपेक्षा ।
न वागशील त्यासवेही असे, हीच मज अपेक्षा ।।
---- जयराज
मर्यादा, बंधन सोडून वागणं,
माझ्या काळजीचं तू, "संशयी" भांडवल केलं ।।
बळावत नसतो संशय, कृतींच्या खताशिवाय ।
मोकळ्या संवादाची औषधी फवारणी, त्यावर एकमात्र जालीम उपाय ।।
माझ्या आठवणी तुजसाठी, केवळ दुःस्वप्न अन् कठोर बोल ।
सोयिस्करपणे विसरलीस माझे, हळवे अन् प्रितीचे बोल ।।
वागली-बोललीस तू कशीही मजसवे ।
मजसाठी तुझ्या मात्र, केवळ सुख आसवे ।।
नसतात गं केवळ, मुलींचीच मनं हळवी ।
असतात काही मुलंही अशी, चुकीस कठोर, पण मनाने हळवी ।।
तूला दाखविता येतात अश्रू, मजसाठी तेही समाजमान्य नाही ।
हलके करायचो मन तुजपाशी, आता तर तोही आधार नाही ।।
आठव साऱ्या घडल्या घटना,
किती केलीस माझी कुचंबना ।
ठेवला तरी मी तुजवर विश्वास,
नाहीच पटले तुझ्या ते मनास ।।
चूकच तूला कळली नाही, मग माफिचा शब्द तरी कुठून येणार? ।
आधी डोळे झाकून दरीत ढकलणार, मगच माझा विश्वास मानणार? ।।
अपेक्षा केलीस तू मजकडून, सतत समजूतदारपणाची ।
आठव कितीदा केलीस कदर, तू माझ्या मनाची? ।।
माझ्या माफिचा अर्थ तूला, तुझ्या अहंकाराचा विजय वाटला ।
ईथेच झाली गफलत तुझी, नात्यांचा तूला भाव न कळला ।।
आता मी एकटा नाही ।
तुझ्या आठवणीं सोबत राही ।।
इतकंच कळलं तुझ्या जाण्याने ।
कोणासही न निवडले, मजसाठी विधात्याने ।।
तूला वाटेल कोणीही चांगला, आता मजपेक्षा ।
न वागशील त्यासवेही असे, हीच मज अपेक्षा ।।
---- जयराज
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा