दिनांक ३ आणि ४ मार्च, २०१७, रोजी मी श्रीनगरमध्ये होतो. तेथील अनुभव, हिमालय यांचं वर्णन मी छायाचित्रांसह (with photo) नंतर करेनच. पण या पोस्ट मधे मी थोडा मजेशीर अनुभव सांगणार आहे.
तर झालं असं, मी ३ तारखेला जम्मूहून विमानाने साधारण सकाळी ११:३0 वा. श्रीनगर विमानतळावर उतरलो. उतरताना पायलटने सूचना सांगितली की बाहेरचे तापमान ८°c आहे. ऐकताना मजा वाटली पण विमानतळाबाहेर पडल्यावर त्याची तीव्रता जाणवू लागली.
बरं श्रीनगरला जायचं मी अगदी ऐनवेळी ठरवलं असल्याने केवळ विमानाचं तिकीट काढलं होतं आणि तिथं जाऊन केवळं आराम करायचा असं ठरवलं होतं. त्यामुळे माझ्यासोबत नेहमी प्रवासात असणाऱ्या (एकमात्र) बॅगेत मी काहीच गरम कपडे घेतले नव्हते.
आराम करायचा यासाठी ठरवलं होतं कि, मी वैष्णोदेवी यात्रा, कट्रा रेलवे स्थानकापासून, जिथे गेस्ट हाऊसवर मी उतरलो होतो तिथून, येऊन जाऊन चालत करणार होतो व दुसऱ्या दिवशी जम्मूतील काही मंदीरांचे दर्शन करणार होतो. त्यामुळे, श्रीनगरला जाऊन आराम करायचा माझा मानस होता.
ठरल्याप्रमाणे, न थांबता (सलग २ तास ४० मिनीटे चालत आणि मधल्या मंदीरांचे दर्शन घेत, पण तेथे न बसता), मी वैष्णोदेवी भवनपर्यंत गेलो आणि तिथे दर्शन घेऊन, तेथील राम मंदीर व वरच्या अंगाचे भैरव मंदीर येथे काही काळ पायांना आराम देवून, व्यवस्थित संध्याकाळी परत आलो. पण माझ्या पायाला काही दिवसांपूर्वी दुखापत झाली असल्याने, त्या दुखापतीने दुसऱ्याच दिवशी पुन्हा डोके वर काढले. माझे राहण्याचे ठिकाण कट्रा रेलवे स्थानकावर आणि जम्मूतील हाॅटेल पण रेलवे स्थानकाजवळच असल्याने मी कसाबसा जम्मूला गेलो आणि दिवसभर हाॅटेलवर आराम केला.
दुसऱ्या दिवशी सकाळी श्रीनगरला निघालो तेव्हा पायांना चांगलाच आराम वाटत होता आणि माझ्यातला प्रवासी आता जागा झाला होता. "श्रीनगरला जायचं आणि बर्फ बघायचा नाही?" माझं मन मलाच प्रश्न विचारु लागलं. मग मी विमानतळावर सारी security checking झाल्यावर श्रीनगरच्या हाॅटेलला फोन लावला आणि माझ्यासाठी गाडीची व्यवस्था करण्याची विनंती केली. त्यांनीही ती लगेच मान्य केली.
मी विमानतळावर उतरताच हाॅटेलची गाडी आली होती. त्याने हाॅटेलवर पोहोचलो आणि "लगेच निघालो तर गुलमर्ग होऊ शकेल" असे कळताच, खोलीत केवळ बॅग टाकून, तसाच गुलमर्गसाठी निघालो. तासाभरात गुलमर्गला पोहोचलो आणि पुढचे ३-४ तास बर्फाचा आणि बर्फवृष्टीचा आनंद घेतला. येताना शंकराचार्यांचे, शंभू मंदीराचे दर्शन घेऊन, संध्याकाळी उशीरा हाॅटेलवर परत आलो आणि रात्री जेवण करुन झोपी गेलो.
दिवसभरचा थकवा आणि गादी गरम ठेवणारी मशीन यांमुळे त्या कडाकीच्या थंडीतही गाढ झोप आली. झोपण्यापूर्वी मला "२४ तास गरम पाण्याची व्यवस्था आहे" असं सांगण्यात आलं होतं आणि मी पण, माझ्या स्वभावानुसार, त्याची खात्री करुनच झोपलो होतो.
दुसऱ्या दिवशी दुपारी १२:३५ वा. माझे पुढील विमान होते. पण जम्मू आणि श्रीनगर विमानतळावर Extra Security Checking होत असल्याने, आपल्याला विमानतळावर उड्डाणाच्या कमीत-कमी २ तास आधी पोहोचणे अपेक्षित असते. त्यानुसार मला हाॅटेलवरुन सकाळी १०:०० वा. निघणे गरजेचे होते.
रात्रीच्या गाढ झोपेतून सकाळी उठायला 8 वाजले. थंडीचा जोर कालपेक्षा कमी नव्हता. पहिल्यांदा गरम पाणी आहे की नाही ते पुन्हा पाहिले. गरम पाणी येत होते. मग घरी फोन करुन आंघोळीला जायला सकाळचे 9 वाजून गेले.
श्रीनगरमध्ये Electricity चा problem असावा, कारण रात्री मी आल्यापासून वीजेचा लपंडाव सुरु होता. नंतर निघताना (४ मार्च २०१७) श्रीनगर विमानतळावर पण तासाभरात एक-दोनदा वीज गेली होती. तशीच ती सकाळी ८:३० च्या सुमारास पुन्हा गेली होती. हाॅटेलमध्ये जनरेटर होते पण त्यावर Geyser(गिझर) चालत नव्हते. त्यासाठी त्यांनी Boiler बसविला होता.
मी आंघोळीला गेलो आणि पाहतो तर काय, बर्फासारखे थंड पाणी येत होते. आता आली का पंचाईत...!!! तशी मला बारमाही थंड पाण्याने आंघोळीची सवय असली तरी श्रीनगरचे ते बर्फाळ थंड पाणी पाहता, ते पाणी अंगावर घेण्याची माझी छाती काही होईना...!!! आणि आंघोळीशिवाय काही न खाण्या-पिण्याची लहानपणापासूनची सवय... मोडेल ती सवय कसली? म्हणून आंघोळ टाळणेही जमत नव्हते. बरं पुन्हा आज दिवसभर सलग, लागोपाठ, जवळपास ७-८ तासांचा, विमानप्रवास असल्यानेही विना आंघोळ रहावेसे वाटत नव्हते. काय करावं या विचारात मी स्वागतकक्षाला (Reception) फोन लावला व त्यांना गरम पाणी येत नसल्याचं सांगितलं. त्यांनीही लगेच Boiler पाहून मला सांगितलंं की, "Boiler आता थंड झाला आहे." त्यामुळे मला वीज येण्याची वाट बघण्याचे सांगितले आणि मग Geyser वापरण्यास सांगितले. पण Geyser ने सुध्दा पाणी गरम होण्यास अर्धा तास लागणार होता. तसेच वीज कधी येईल त्याचा भरवसा काय? जवळपास सकाळचे ९:३० होत आले होते आणि कोणत्याही परिस्थितीत सकाळी १०:०० वा. हाॅटेलवरुन निघायचेच होते. त्यामुळे वीजेची वाट बघण्यात काहीच अर्थ नव्हता.
मग मोठ्या कष्टाने आजची आंंघोळ टाळायची ठरवली आणि केवळ तोंड, हात, पाय धुवून निघायचे ठरविले. थोडे थंड पाणी तोंडावर मारताच अक्षरशः माझे तोंड सुजल्यासारखे वाटले. पण मग थोडीशी सवय झाल्यासारखी वाटली आणि एकदम तशाच बर्फाळ पाण्याने आंघोळ करायची ठरविली. शाळेत असताना आम्हांला हिवाळ्यातच सकाळी पोहायला नेत असत. त्या दिवसांची आठवण झाली. आता त्या तापमानात आणि इथल्या तापमानात कमालीचा फरक असला तरी "आंघोळ तर करायचीच" असा निश्चय झाल्याने, शंभू महादेवाला स्मरुन, हर हर गंगे, हर हर महादेवचा जप करत ते बर्फाचे पाणी, छे चक्क बर्फ, अंगावर घेतले एकदाचे...!!!
अहाहा..!!! काय विलक्षण अनुभव होता तो...!!! सुरुवातीला एक-दोन मग पाणी अंगावर पडले तेव्हा खूप थंडी जाणवली पण नंतर मात्र गंमत वाटू लागली. मस्त एक-दीड बादली पाण्याने आंघोळ करुन बाहेर आलो त्यावेळी हृदय अक्षरशः बाहेर येऊन धडकत आहे की काय असे वाटत होते. सर्वांगातून थंडगार वाफा निघत होत्या.
आणि मजेची गोष्ट अशी की, मी आंघोळ करुन बाहेर पडायला आणि वीज यायला एकच गाठ पडली. पण आंघोळ तर झाली होती आणि ही वीज पुन्हा कधी जाईल याचा काही भरवसा नव्हता. त्यामुळे तीचा आता काही एक उपयोग नव्हता...
आता थंडी कमी जाणवू लागली होती. उत्साहाच्या भरात, "आज कुछ तुफानी करते है" म्हणत, अशा थंडीत, थंड पाण्याने आंघोळ तर केली पण त्याचा काही दुष्परिणाम झाला तर...? आता माझ्या डोक्यात हे विचार येऊ लागले. पण "जेव्हा होईल तेव्हा पाहू" या विचाराने सामानाची बांधा-बांध केली आणि विमानतळावर जायला निघालो.
त्यानंतर पुढचा प्रवासही व्यवस्थित झाला आणि हि पोस्ट लिहीत असताना नुकत्याच सलग आलेल्या ३ शिंका सोडल्या तर, आत्त्तापर्यंत तरी मी धड-धाकट आहे. पुढचे देव जाणे...!!! असा हा माझा एक तुफानी अनुभव...!!! तुमचाही असा काही तुफानी अनुभव असेल तर नक्की सांगा...!!!
तर झालं असं, मी ३ तारखेला जम्मूहून विमानाने साधारण सकाळी ११:३0 वा. श्रीनगर विमानतळावर उतरलो. उतरताना पायलटने सूचना सांगितली की बाहेरचे तापमान ८°c आहे. ऐकताना मजा वाटली पण विमानतळाबाहेर पडल्यावर त्याची तीव्रता जाणवू लागली.
बरं श्रीनगरला जायचं मी अगदी ऐनवेळी ठरवलं असल्याने केवळ विमानाचं तिकीट काढलं होतं आणि तिथं जाऊन केवळं आराम करायचा असं ठरवलं होतं. त्यामुळे माझ्यासोबत नेहमी प्रवासात असणाऱ्या (एकमात्र) बॅगेत मी काहीच गरम कपडे घेतले नव्हते.
आराम करायचा यासाठी ठरवलं होतं कि, मी वैष्णोदेवी यात्रा, कट्रा रेलवे स्थानकापासून, जिथे गेस्ट हाऊसवर मी उतरलो होतो तिथून, येऊन जाऊन चालत करणार होतो व दुसऱ्या दिवशी जम्मूतील काही मंदीरांचे दर्शन करणार होतो. त्यामुळे, श्रीनगरला जाऊन आराम करायचा माझा मानस होता.
ठरल्याप्रमाणे, न थांबता (सलग २ तास ४० मिनीटे चालत आणि मधल्या मंदीरांचे दर्शन घेत, पण तेथे न बसता), मी वैष्णोदेवी भवनपर्यंत गेलो आणि तिथे दर्शन घेऊन, तेथील राम मंदीर व वरच्या अंगाचे भैरव मंदीर येथे काही काळ पायांना आराम देवून, व्यवस्थित संध्याकाळी परत आलो. पण माझ्या पायाला काही दिवसांपूर्वी दुखापत झाली असल्याने, त्या दुखापतीने दुसऱ्याच दिवशी पुन्हा डोके वर काढले. माझे राहण्याचे ठिकाण कट्रा रेलवे स्थानकावर आणि जम्मूतील हाॅटेल पण रेलवे स्थानकाजवळच असल्याने मी कसाबसा जम्मूला गेलो आणि दिवसभर हाॅटेलवर आराम केला.
दुसऱ्या दिवशी सकाळी श्रीनगरला निघालो तेव्हा पायांना चांगलाच आराम वाटत होता आणि माझ्यातला प्रवासी आता जागा झाला होता. "श्रीनगरला जायचं आणि बर्फ बघायचा नाही?" माझं मन मलाच प्रश्न विचारु लागलं. मग मी विमानतळावर सारी security checking झाल्यावर श्रीनगरच्या हाॅटेलला फोन लावला आणि माझ्यासाठी गाडीची व्यवस्था करण्याची विनंती केली. त्यांनीही ती लगेच मान्य केली.
मी विमानतळावर उतरताच हाॅटेलची गाडी आली होती. त्याने हाॅटेलवर पोहोचलो आणि "लगेच निघालो तर गुलमर्ग होऊ शकेल" असे कळताच, खोलीत केवळ बॅग टाकून, तसाच गुलमर्गसाठी निघालो. तासाभरात गुलमर्गला पोहोचलो आणि पुढचे ३-४ तास बर्फाचा आणि बर्फवृष्टीचा आनंद घेतला. येताना शंकराचार्यांचे, शंभू मंदीराचे दर्शन घेऊन, संध्याकाळी उशीरा हाॅटेलवर परत आलो आणि रात्री जेवण करुन झोपी गेलो.
दिवसभरचा थकवा आणि गादी गरम ठेवणारी मशीन यांमुळे त्या कडाकीच्या थंडीतही गाढ झोप आली. झोपण्यापूर्वी मला "२४ तास गरम पाण्याची व्यवस्था आहे" असं सांगण्यात आलं होतं आणि मी पण, माझ्या स्वभावानुसार, त्याची खात्री करुनच झोपलो होतो.
दुसऱ्या दिवशी दुपारी १२:३५ वा. माझे पुढील विमान होते. पण जम्मू आणि श्रीनगर विमानतळावर Extra Security Checking होत असल्याने, आपल्याला विमानतळावर उड्डाणाच्या कमीत-कमी २ तास आधी पोहोचणे अपेक्षित असते. त्यानुसार मला हाॅटेलवरुन सकाळी १०:०० वा. निघणे गरजेचे होते.
रात्रीच्या गाढ झोपेतून सकाळी उठायला 8 वाजले. थंडीचा जोर कालपेक्षा कमी नव्हता. पहिल्यांदा गरम पाणी आहे की नाही ते पुन्हा पाहिले. गरम पाणी येत होते. मग घरी फोन करुन आंघोळीला जायला सकाळचे 9 वाजून गेले.
श्रीनगरमध्ये Electricity चा problem असावा, कारण रात्री मी आल्यापासून वीजेचा लपंडाव सुरु होता. नंतर निघताना (४ मार्च २०१७) श्रीनगर विमानतळावर पण तासाभरात एक-दोनदा वीज गेली होती. तशीच ती सकाळी ८:३० च्या सुमारास पुन्हा गेली होती. हाॅटेलमध्ये जनरेटर होते पण त्यावर Geyser(गिझर) चालत नव्हते. त्यासाठी त्यांनी Boiler बसविला होता.
मी आंघोळीला गेलो आणि पाहतो तर काय, बर्फासारखे थंड पाणी येत होते. आता आली का पंचाईत...!!! तशी मला बारमाही थंड पाण्याने आंघोळीची सवय असली तरी श्रीनगरचे ते बर्फाळ थंड पाणी पाहता, ते पाणी अंगावर घेण्याची माझी छाती काही होईना...!!! आणि आंघोळीशिवाय काही न खाण्या-पिण्याची लहानपणापासूनची सवय... मोडेल ती सवय कसली? म्हणून आंघोळ टाळणेही जमत नव्हते. बरं पुन्हा आज दिवसभर सलग, लागोपाठ, जवळपास ७-८ तासांचा, विमानप्रवास असल्यानेही विना आंघोळ रहावेसे वाटत नव्हते. काय करावं या विचारात मी स्वागतकक्षाला (Reception) फोन लावला व त्यांना गरम पाणी येत नसल्याचं सांगितलं. त्यांनीही लगेच Boiler पाहून मला सांगितलंं की, "Boiler आता थंड झाला आहे." त्यामुळे मला वीज येण्याची वाट बघण्याचे सांगितले आणि मग Geyser वापरण्यास सांगितले. पण Geyser ने सुध्दा पाणी गरम होण्यास अर्धा तास लागणार होता. तसेच वीज कधी येईल त्याचा भरवसा काय? जवळपास सकाळचे ९:३० होत आले होते आणि कोणत्याही परिस्थितीत सकाळी १०:०० वा. हाॅटेलवरुन निघायचेच होते. त्यामुळे वीजेची वाट बघण्यात काहीच अर्थ नव्हता.
मग मोठ्या कष्टाने आजची आंंघोळ टाळायची ठरवली आणि केवळ तोंड, हात, पाय धुवून निघायचे ठरविले. थोडे थंड पाणी तोंडावर मारताच अक्षरशः माझे तोंड सुजल्यासारखे वाटले. पण मग थोडीशी सवय झाल्यासारखी वाटली आणि एकदम तशाच बर्फाळ पाण्याने आंघोळ करायची ठरविली. शाळेत असताना आम्हांला हिवाळ्यातच सकाळी पोहायला नेत असत. त्या दिवसांची आठवण झाली. आता त्या तापमानात आणि इथल्या तापमानात कमालीचा फरक असला तरी "आंघोळ तर करायचीच" असा निश्चय झाल्याने, शंभू महादेवाला स्मरुन, हर हर गंगे, हर हर महादेवचा जप करत ते बर्फाचे पाणी, छे चक्क बर्फ, अंगावर घेतले एकदाचे...!!!
अहाहा..!!! काय विलक्षण अनुभव होता तो...!!! सुरुवातीला एक-दोन मग पाणी अंगावर पडले तेव्हा खूप थंडी जाणवली पण नंतर मात्र गंमत वाटू लागली. मस्त एक-दीड बादली पाण्याने आंघोळ करुन बाहेर आलो त्यावेळी हृदय अक्षरशः बाहेर येऊन धडकत आहे की काय असे वाटत होते. सर्वांगातून थंडगार वाफा निघत होत्या.
आणि मजेची गोष्ट अशी की, मी आंघोळ करुन बाहेर पडायला आणि वीज यायला एकच गाठ पडली. पण आंघोळ तर झाली होती आणि ही वीज पुन्हा कधी जाईल याचा काही भरवसा नव्हता. त्यामुळे तीचा आता काही एक उपयोग नव्हता...
आता थंडी कमी जाणवू लागली होती. उत्साहाच्या भरात, "आज कुछ तुफानी करते है" म्हणत, अशा थंडीत, थंड पाण्याने आंघोळ तर केली पण त्याचा काही दुष्परिणाम झाला तर...? आता माझ्या डोक्यात हे विचार येऊ लागले. पण "जेव्हा होईल तेव्हा पाहू" या विचाराने सामानाची बांधा-बांध केली आणि विमानतळावर जायला निघालो.
त्यानंतर पुढचा प्रवासही व्यवस्थित झाला आणि हि पोस्ट लिहीत असताना नुकत्याच सलग आलेल्या ३ शिंका सोडल्या तर, आत्त्तापर्यंत तरी मी धड-धाकट आहे. पुढचे देव जाणे...!!! असा हा माझा एक तुफानी अनुभव...!!! तुमचाही असा काही तुफानी अनुभव असेल तर नक्की सांगा...!!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा