तो होता साधारण,
ती रुपगर्विता छान ।
दैवाने मिळविले त्यांना,
होण्या दोन जीव एक प्राण ।।१।।
होता प्रसन्न आज तो जाम,
व्यक्त केले तिजसमोर प्रेम ।
न समजून अन् अवघडून,
ती म्हणाली, "विश यू दि सेम" ।।२।।
वेडाच तो हरखून गेला,
मंदीरात तीला घेऊन आला ।
एकच मागणे मागितले देवाला,
"सुखी ठेव माझ्या प्रियेला" ।।३।।
विश्वास तीच्या मनी येण्यास,
त्याने केले अखंड सायास ।
तीचा केवळ एकच प्रयास,
विना सायास त्याने ठेवावा विश्वास ।।४।।
आणि त्याने तो ठेवलाही,
तीच्या बहाण्यांवर,
तीच्या दुर्लक्षिण्यावर,
अन् तीच्या खोट्यांवरही ।। ५।।
तीचे शिक्षण, तीचा अहंकार,
समाजात तीला, होता म्हणे मान ।
प्रेमात झुकणे, तीचा आदर,
मोडून गेली त्याची मान ।।६।।
बोच वाटत होती तिजला, त्याच्या प्रवचनांची,
गरज वाटत नव्हती तिजला, त्याच्या उपदेशांची ।। ७।।
मस्त मस्तीत तीचे जगणे,
चूक असूनही माफी न मागणे ।
स्वतःस फार शहाणे समजणे,
आपले सोडून इतर तुच्छ मानणे ।।८।।
छोट्या-छोट्या चुका त्याने दुर्लक्षिल्या,
पण मोठ्या चुकांनी बेबनाव झाला ।।९।।
तीचे बहाणे, दुर्लक्ष करणे,
तो मनाने सैरभैर झाला ।
त्याची तळमळ, काळजी करणे,
तीला अविश्वास वाटू लागला ।।१०।।
अन् मग आले एक जुने वादळ, त्यांच्या प्रेमात,
ज्याने आणिले अंतर, दोघांच्याही मनात ।।११।।
करावे तीचे वादळापासून रक्षण,
उभा ठाकला तो बनूनी ढाल ।
ओळखून काळाचे बदलते चलन,
तीनेही बदलली आपली चाल ।।१२।।
वादळाने मारले तडाखे बेगुमान,
रक्षुनी तिजला झाला तोच बदनाम ।।१३।।
बदलून चाल त्या वादळात,
गमावले तीने जीवापाड जपणाऱ्यास ।
त्याचेही खाडकन उघडले नयन,
गमावून प्रेम न करणाऱ्यास ।।१४।।
आता तो शांत आहे,
निराश, हताश नसला तरी,
थोडासा अबोल आहे ।।१५।।
प्रयत्न करतोय हसू आणण्याचा,
पाणीदार डोळ्यांत अश्रु लपविण्याचा ।
स्थिर, गंभीरपणे जीवन सावरण्याचा,
राखेतून पुन्हा उभे राहण्याचा ।।१६।।
हरविला आहे त्याचा जणू, जीवनाचा सुर,
जशा माझ्या कविता, बेताल अन् बेसुर ।।१७।।
आजही तो तीलाच आठवतो,
त्याच्या सुखांच्या क्षणांत ।
कारण नव्हती तीची साथ त्याला,
कधीही दुःखांच्या क्षणांत ।।१८।।
तीचं मन हळवं, तीच्या अश्रुंमुळे वाटतं,
त्याचं हळवं मन, त्याच्या लपविण्यातून दिसतं ।।१९।।
आणि कदाचित तीलाही कळेल,
जर कधी समजलंच असेल,
तीला त्याचं हळवं मन... ।।२०।।
मनापासूनच मागणं, देवही ऐकतो,
अजूनही तिजला सुखातच ठेवितो ।।२१।।
तीच्या सुखाचे गाऱ्हाणं मांडता,
एक चूक झालीच त्याची ।
"ठेव सोबतच आम्हां उभयतां",
मागणी अशी देवास मागण्याची ।।२२।।
कधी-कधी तो विचार करी,
का मिळालं मजं खोटं प्रेम? ।
म्हणूनच का ती म्हणाली होती,
केवळ "विश यू दि सेम?" ।।२३।।
त्याचा सोबती एकटेपणा, पुस्तकं आणि शब्द,
तीच्या क्षणिक सोबतीने, दुःख झाले होते एकवार निःशब्द ।।२४।।
आताशा तो तीचा विचार करत नाही,
कारण तीच्या परतण्याची त्यास आशा नाही ।
आणि आलीच ती कधी परत पुन्हा,
ती पूर्वीची, त्याचीच ती, असणार नाही ।। २५।।
दृष्टी नाही बदलली अजून, त्याने आयुष्य बघण्याची,
अजुनही आहे आस तयांस, खरे प्रेम गवसण्याची ।।२६।।
मिळावा तिजला मनासारखा,
मागणे तयाचे आता स्पष्ट ।
न लिहावी पुन्हा कोणी,
एका खोट्या प्रेमाची गोष्ट ।।२७।।
---- जयराज
तळटीप : वरील कवितेतील गोष्ट ही पुर्णतः काल्पनिक असून तिचा वास्तविक जीवनाशी काही एक संबंध नाही. असा संबंध कोठे आढळून आल्यास, तो एक निव्वळ योगायोग समजावा.
ताजा कलम : तसेच एका वाचकांनी असे सांगितले कि जर कविता खालून वर अशी उलटी (कडव्यांनी) वाचली तर सुखांत होतो.
ती रुपगर्विता छान ।
दैवाने मिळविले त्यांना,
होण्या दोन जीव एक प्राण ।।१।।
होता प्रसन्न आज तो जाम,
व्यक्त केले तिजसमोर प्रेम ।
न समजून अन् अवघडून,
ती म्हणाली, "विश यू दि सेम" ।।२।।
वेडाच तो हरखून गेला,
मंदीरात तीला घेऊन आला ।
एकच मागणे मागितले देवाला,
"सुखी ठेव माझ्या प्रियेला" ।।३।।
विश्वास तीच्या मनी येण्यास,
त्याने केले अखंड सायास ।
तीचा केवळ एकच प्रयास,
विना सायास त्याने ठेवावा विश्वास ।।४।।
आणि त्याने तो ठेवलाही,
तीच्या बहाण्यांवर,
तीच्या दुर्लक्षिण्यावर,
अन् तीच्या खोट्यांवरही ।। ५।।
तीचे शिक्षण, तीचा अहंकार,
समाजात तीला, होता म्हणे मान ।
प्रेमात झुकणे, तीचा आदर,
मोडून गेली त्याची मान ।।६।।
बोच वाटत होती तिजला, त्याच्या प्रवचनांची,
गरज वाटत नव्हती तिजला, त्याच्या उपदेशांची ।। ७।।
मस्त मस्तीत तीचे जगणे,
चूक असूनही माफी न मागणे ।
स्वतःस फार शहाणे समजणे,
आपले सोडून इतर तुच्छ मानणे ।।८।।
छोट्या-छोट्या चुका त्याने दुर्लक्षिल्या,
पण मोठ्या चुकांनी बेबनाव झाला ।।९।।
तीचे बहाणे, दुर्लक्ष करणे,
तो मनाने सैरभैर झाला ।
त्याची तळमळ, काळजी करणे,
तीला अविश्वास वाटू लागला ।।१०।।
अन् मग आले एक जुने वादळ, त्यांच्या प्रेमात,
ज्याने आणिले अंतर, दोघांच्याही मनात ।।११।।
करावे तीचे वादळापासून रक्षण,
उभा ठाकला तो बनूनी ढाल ।
ओळखून काळाचे बदलते चलन,
तीनेही बदलली आपली चाल ।।१२।।
वादळाने मारले तडाखे बेगुमान,
रक्षुनी तिजला झाला तोच बदनाम ।।१३।।
बदलून चाल त्या वादळात,
गमावले तीने जीवापाड जपणाऱ्यास ।
त्याचेही खाडकन उघडले नयन,
गमावून प्रेम न करणाऱ्यास ।।१४।।
आता तो शांत आहे,
निराश, हताश नसला तरी,
थोडासा अबोल आहे ।।१५।।
प्रयत्न करतोय हसू आणण्याचा,
पाणीदार डोळ्यांत अश्रु लपविण्याचा ।
स्थिर, गंभीरपणे जीवन सावरण्याचा,
राखेतून पुन्हा उभे राहण्याचा ।।१६।।
हरविला आहे त्याचा जणू, जीवनाचा सुर,
जशा माझ्या कविता, बेताल अन् बेसुर ।।१७।।
आजही तो तीलाच आठवतो,
त्याच्या सुखांच्या क्षणांत ।
कारण नव्हती तीची साथ त्याला,
कधीही दुःखांच्या क्षणांत ।।१८।।
तीचं मन हळवं, तीच्या अश्रुंमुळे वाटतं,
त्याचं हळवं मन, त्याच्या लपविण्यातून दिसतं ।।१९।।
आणि कदाचित तीलाही कळेल,
जर कधी समजलंच असेल,
तीला त्याचं हळवं मन... ।।२०।।
मनापासूनच मागणं, देवही ऐकतो,
अजूनही तिजला सुखातच ठेवितो ।।२१।।
तीच्या सुखाचे गाऱ्हाणं मांडता,
एक चूक झालीच त्याची ।
"ठेव सोबतच आम्हां उभयतां",
मागणी अशी देवास मागण्याची ।।२२।।
कधी-कधी तो विचार करी,
का मिळालं मजं खोटं प्रेम? ।
म्हणूनच का ती म्हणाली होती,
केवळ "विश यू दि सेम?" ।।२३।।
त्याचा सोबती एकटेपणा, पुस्तकं आणि शब्द,
तीच्या क्षणिक सोबतीने, दुःख झाले होते एकवार निःशब्द ।।२४।।
आताशा तो तीचा विचार करत नाही,
कारण तीच्या परतण्याची त्यास आशा नाही ।
आणि आलीच ती कधी परत पुन्हा,
ती पूर्वीची, त्याचीच ती, असणार नाही ।। २५।।
दृष्टी नाही बदलली अजून, त्याने आयुष्य बघण्याची,
अजुनही आहे आस तयांस, खरे प्रेम गवसण्याची ।।२६।।
मिळावा तिजला मनासारखा,
मागणे तयाचे आता स्पष्ट ।
न लिहावी पुन्हा कोणी,
एका खोट्या प्रेमाची गोष्ट ।।२७।।
---- जयराज
तळटीप : वरील कवितेतील गोष्ट ही पुर्णतः काल्पनिक असून तिचा वास्तविक जीवनाशी काही एक संबंध नाही. असा संबंध कोठे आढळून आल्यास, तो एक निव्वळ योगायोग समजावा.
ताजा कलम : तसेच एका वाचकांनी असे सांगितले कि जर कविता खालून वर अशी उलटी (कडव्यांनी) वाचली तर सुखांत होतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा