मंगळवार, १४ मार्च, २०१७

कविता : पोकळी

नाकारुन मज निघून गेलीस,
सुख स्वप्ने पायाखाली ।
मिळवावी तुज मनाविरुध्द,
पण ती माझी फितरत नाही ।।१।।

चूक माझी मोठी वाटली,
आपल्या हजारो विसरुन गेलीस ।
एका चुकिची हजार माफी,
माफिचा तुझा चकार नाही ।।२।।

जायचेच होते तीला जर देवा,
का माझ्या जीवनात आणलेस?
होतेच खोटे प्रेम जर तीचे,
का न मला तू सजग केलेस? ।।३।।

रडत नाही मी आता,
खोट्या प्रेमाची हीच व्यथा ।
एकांगी जीव कुणी टाकता,
मारी त्यास नशीब चापटा ।।४।।

खंबीर उभा हिमालयाप्रत मी,
निश्चल, आधार भासे सर्वांस ।
तप्त लाव्हारस अन् ज्वालामुखी,
चाहूल नसे जन-माणसांस ।।५।।

वर्षांमागून वर्ष आणिक,
दिवसांमागून दिवस गेले ।
काय सांगू अन् कसं सांगू,
शब्दच मला सोडून गेले ।।६।।

न जमले या जन्मात जरी,
पुढील जन्मी प्रयत्न करेन ।
जन्म जन्मांतरीचे नाते आपुले,
असे कसे अधुरे ठरेन? ।। ७।।

तू हि कर प्रयत्न पुन्हा 
या न जमल्यास पुढल्या जन्मा ।
घडल्या चुका दोहो बाजूंनी 
न घडाव्या पुन्हा हातुनी ।।८।।

कर सदा विचार डोक्यानी 
प्रेमात मात्र केवळ हृदयानी ।
मिळालाच असा प्रेमळ कोणी,
नकोस तोडू त्याला मनानी ।।९।।

- जयराज 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा