गुरुवार, ३० मार्च, २०१७

कविता : भेट (अखेरची?)

खरंच नव्हती गं मनिषा माझी,
तुझ्या मित्रांना येऊन भेटण्याची 
होती केवळ एकच ईच्छा,
तुला आश्चर्यचकित करणारी भेट देण्याची 

तुझ्या डोळ्यांतील भाव टिपण्याची,
लटक्या रागाचे रूप पाहण्याची 

लटक्या बोलातून, कळी खुलावून,
हळूच हसून, जराशी लाजून, 
मग म्हणशील माझ्या कानामधी,
"का न बोललात मला, येण्याचे आधी?"

अन् मग जाताना येईल तुझा,
अपेक्षित असा "एक तरी" फोन कॉल 
"निघालात का?" "पुन्हा कधी याल?"
"पोहोचताच नक्की कॉल कराल"

पण नाहीच दिसला तो,
डोळ्यात तुझ्या भावही नीट 
अन् नाही आला कॉलही,
होती का हि आपली अखेरची भेट?

गाडीही आज तब्बल दीड तास लेट आहे,
तुझ्या कॉलचीच जणू तीही वाट पाहे

कधी वाटलंच एकटं तुला,
तर काढ माझी आठवण 
हक्काच होतं तुझ्याकडेही तुझंच,
नि:स्वार्थी प्रेमाचे मजरुपी तारांगण 

कधी जमल्यास आठव ते माझे दररोजचे,
प्रचंड व्यापातूनही वेळ काढून केलेले,
सकाळ, दुपार, संध्याकाळचे कॉल्स 

तुझा आवाज ऐकल्यावाचून, राहिलेली माझी जेवणं,
अखंड पाठवलेली मेसेजेस, माझी झालेली जागरणं 

अन् तुझे न आलेले रिप्लाय पाहून,
तुझ्या तसबिरीशी माझं बोलणं 

एखादं तर कधी,
केलंत का काही,
स्वत:हून आपण?

राग नाही हा,
केवळ विचारणं 

नसतील कदाचित प्रेमाच्या तुझ्या,
अपेक्षा अशा साधारण 

पण, 

एकदा तरी विचार करायचा, मला दूर लोटताना,
थोडंसं तरी समजून घ्यायचं, आपलं नातं संपवताना

का, समजून घेण्याचा वसा, केवळ नेहमी माझाच?
अन् कसेही वागायचा, मला नाकारायचा, अधिकार केवळ तुलाच?

दूर जर जायचेच होते, तुजला मजपासून,
का बोलाविलेस मग मला, तू अश्रू ढाळून?

असतेच नाकारायचे मज तुजला,
आलो असतो का मी भेटायला तुला?

निघालोय मी आता, परतीच्या प्रवासाला,
एकलाच... 
अन् भकास वाटे निसर्ग सौन्दर्यही आज 

असे म्हणतात दुराव्याने,
कळते एखाद्याची किंमत,
तुला न कळे पण,
तू जवळ असतानाही,
होती मला ती जाण
(खरंच हे सांगायची गरज आहे?)
तुझेच नव्हते प्रिये (खरंच आता मी हे म्हणू शकतो?)
मजविषयी चांगले मत 

गाडीने आता वेग घेतला आहे,
अन मनानेही मी दूर जात आहे 

दूर दूर... खूप दूर... 

तुझ्यापासून... 

कदाचित कायमचाच... 

केवळ तुझाच... असूनही नसलेला...


---- जयराज 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा